प्रतिनिधी/ पणजी
राज्यात विवाहाचा हंगाम धुमधडाक्यात सुरु झाला असून त्यात मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. आमदार, मंत्री देखील सहभागी होतात परंतु मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.
विवाह सोहळ्य़ात मर्यादित लोकांनाच प्रवेश आहे आणि त्या आशयाची एसओपी सरकारने जारी केली असली तरी त्याचे पालन होत नाही. विवाहात लोकांची मोठी गर्दी होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. देखरेख ठेवणारी यंत्रणाच नाही. शिवाय लग्न सोहळ्य़ात सामाजिक अंतर राखणे शक्य होत नाही. विवाहासाठी 200 जणांची मर्यादा असली तरी निमंत्रणे 500 पेक्षा अधिक लोकांना देण्यात येतात. त्यामुळे अनेक सोहळ्य़ात 1000 पेक्षाही जास्त लोकांची गर्दी होत आहे. तेथे खाणे – पिणे करताना, एकत्र गप्पा करताना, वधू-वरांना भेटताना कसलेच कोरोना नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
आमदार – मंत्री यांनाही अशा लग्न सोहळ्य़ात मास्क, सामाजिक अंतराचे भान राहात नाही असे वेळोवेळी दिसून आले आहे. त्याचे अनुभव अनेकांना येत आहेत. या सर्व प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
लग्न सोहळ्य़ातून 100 जणांना कोरोनाची लागण एका लग्न सोहळ्य़ातून 100 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. अशा सोहळ्य़ात लोक मास्क वापरत नाहीत शिवाय सामाजिक अंतर देखील पाळत नाहीत म्हणून दुसरी कोरोनाची लाट येण्याचाही धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. गोमेकॉत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गेल्यास कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. नाहीतर कोरोना वाढू शकतो. तो रोखणे आपल्याच हातात आहे. जनतेने