अमेरिकेचा दावा : भारताला दक्ष राहण्याचा इशारा : चीनला रोखण्यासाठी भारताला मदत पुरविण्याचीही तयारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवरून सुरू असलेला तणाव धुमसत असतानाच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा सतर्क केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनने लडाख सीमेवर 60 हजार सैनिकांना तैनात केल्याचा दावा करत भारतानेही दक्ष राहायला हवे, असे म्हटले आहे. तसेच चीनविरोधातील लढाईत भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज भासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची नुकतीच टोकियोमध्ये बैठक पार पडली. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच समोरासमोर पार पडलेल्या या बैठकीत अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. बैठकीतून परतल्यानंतर माईक पोम्पिओ यांनी तीन मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी चीनकडून असणारे धोके तसेच नियमांचे उल्लंघन आदी मुद्दय़ांवर परिस्थितीनुरुप भाष्य केले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चारही बडय़ा देशांना चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे, असे मतही पॉम्पिओ यांनी नोंदवले आहे. भारताला सध्या चीनविरोधात मोठा लढा द्यावा लागत आहे. चीनने लडाखमध्ये आता मोठय़ा प्रमाणात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. त्याला अनुसरून चीनला रोखण्यासाठी ‘क्वाड’ देश धोरण आखत असल्याची माहिती पोम्पिओ यांनी दिली.
भारत दौऱयावर येणार अमेरिकन मंत्रीमहोदय
अमेरिकन परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ हे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्यासह भारताच्या दौऱयावर येणार आहेत. यावेळी ते भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. तसेच उप-परराष्ट्रमंत्री स्टीफन बेग है बैठकीच्या तयारीसाठी पुढील आठवडय़ात भारताच्या दौऱयावर येणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱयात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या संघर्षादरम्यान चीनने आपल्या जवानांचा मत्यू झाल्याची बाब स्वीकारली असली तरी मृत जवानांची संख्या मात्र सांगितलेली नाही. तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात अनेकदा उच्चस्तरीय चर्चा झाल्यानंतरही चीनच्या कुरापती या सुरूच आहेत.
भारताच्या मदतीसाठी अमेरिका सज्ज
एलएसीवर भारत चीनदरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनच्या भूमिकेबाबत इशारा देत भारताशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. चीनच्या कुरापतींबाबत इशारा देत पॉम्पिओ यांनी भारत-अमेरिकेदरम्यानच्या घनि÷ संबंधांचा पुनरुच्चार केला. व भारताला सहकाऱयाच्या रूपात अमेरिकेची गरज असल्याचेही सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक मजबूत युती तयार केली असल्याचा दावाही त्यांनी केला.