वृत्तसंस्था/ मुंबई
जगासोबत संपूर्ण देशात कोरोनाचा धोका वाढतानाच दिसत आहे. यामुळे काही निमय व अटीच्या अधिन राहून सामाजिक अंतर राखण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या सुविधा देण्यासाठी उद्योगांसह आर्थिक क्षेत्रातून बदल करण्यावर सरकार भर देत आहे. यामध्ये सर्वाधिक लोकांची वर्दळ असणाऱया एटीएमसारख्या ठिकाणी आता बँकांकडून विना टच एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
ग्राहकांना आपले पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करावा लागतो. या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढण्याची भीती अधिक होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या कार्डचा वापर करुन संबंधीत रक्कम काढण्यासाठी मशीनला स्पर्श करावा लागत असल्यानेच वेगळी संकल्पना राबवण्याचा बँका विचार करत आहेत.
पेमेन्ट्स कंपनी एजीएस ट्रांजेक्ट टेक्नॉलॉजी यांनी यासाठी एक प्रोटोटाइपचे मशिन बनविले आहे. यामध्ये स्क्रीनवर क्मयुआर कोड स्कॅन करुन मशीनवर इंटरफेसच्या आधारे बँकेच्या मोबाईल ऍपचा वापर करुन आपला व्यवहार करण्यासाठी मोबाईलवर रक्कम आणि पिन टाकून हवी ती रक्कम काढण्याची सोय प्राप्त करुन देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
परंपरागत स्वरुपात असणाऱया एटीएम मशिनच्या खातेदारांना आपल्या मॅग्नेटीक चिप असणाऱया कार्डचा वापर करुन व्यवहार करावा लागतो. परंतु आता आगामी काळात विना टच ग्राहकांना एटीएम व्यवहार करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे बँकेच्या तज्ञांनी म्हटले आहे.
निवडक एटीएममध्ये सुविधा
एजीएस ट्रांजेक्ट यांच्याकडून देशभरातील बँकांमध्ये जवळपास 70 हजार एटीएमची सुविधा दिली जात आहे. कंपनी दोन बँकांसाठी कॉन्टॅक्टलेस एटीएमवर काम करत आहे. सोबत अन्य चार बँकांना ही योजना देण्यासाठी चर्चा करीत आहे. यामुळे आगामी आठ आठवडय़ात संबंधीत सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन विना टच सुविधा उपलब्ध करुन देण्यावर कंपनी प्रयत्न करणार आहे.