नवी दिल्ली
देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंता वाढली असली तरी येणाऱया काळात लसीकरणाला वेग दिला गेल्यास अर्थव्यवस्था पुन्हा बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्या आशिमा गोयल यांनी व्यक्त केले आहे. एकदा लसीकरण मोहिमेने गती घेतली की भारतीय अर्थव्यवस्था सुधारू लागेल. मागणीत वाढ, जागतिक स्तरावर सुधारलेली स्थिती आणि वित्तीय व्यवस्थेत आलेली सुधारणा पाहता अर्थव्यवस्था लवकरच वेग पकडेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.