केंद्र सरकारकडून राज्यांना निर्देश : लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून संरक्षण करता येत असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना लसीकरणासंबंधी महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. लसीचा दुसरा डोस घेणाऱयांना मोहिमेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. देशातील 80-90 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्मय आहे. साहजिकच सध्या लसीकरण हा एकमेव उपाय असल्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस घेतल्याशिवाय परतावे लागत आहेत. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱया नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. देशाच्या अनेक भागात लसीकरण केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच रांगा लावून उभे राहत आहे. असे असतानाही मर्यादित लसींच्या साठय़ामुळे शेकडो नागरिकांना खाली हाती जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आता राज्य सरकारनेही प्रत्येक जिह्यातील लसीकरण यंत्रणांना दुसरा डोस घेणाऱयांना प्राधान्य देण्याची सूचना केली आहे.
केंद्र-राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता जिह्यात किती नागरिकांचे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, याची माहिती लसीकरण यंत्रणेला देण्यासही सांगितले आहे. सध्या पहिला डोस घेणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. मात्र लसींच्या तुटवडय़ामुळे अनेकांच्या दुसऱया डोसचा कालावधी लांबल्यामुळे सर्व जिह्यांमधील लसीकरण यंत्रणांनी दुसरा डोस घेणाऱया नागरिकांना प्राधान्य द्यावे, असे पत्रात नमूद केले आहे.
केंद्राकडून राज्यांना गंभीर इशारा ‘लॉकडाऊन’ शिथिल केल्यानंतर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे. तज्ञांनी कोरोना साथीच्या तिसऱया लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेताना दिसत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड नियम पाळले नाही तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. अनेक लोक कोविड नियमांचे पालन करत नसल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशवासियांना गंभीर इशारा दिला आहे.