कोरोना लसीच्या जतनीकरणापासून प्रत्यक्ष लसीकराणाउपरांत उद्भवणाऱया सकारात्मक-नकारात्मक परिणामांची समज सर्वसामान्यांना करून देणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही.
कोरोना महामारीने सर्वसामान्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे. महामारीने होत असलेल्या मनुष्यहानीचा धसका सर्वांनीच घेतला आहे. दैनंदिन जीवन आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. यातून कोरोना प्रतिबंधावर येऊ घातलेली लस आशेचा किरण दाखवत आहे. लस बाजारात आली की आपल्याला मुक्त जीवन जगायला मिळेल. यामुळे कोरोना लसीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र ही उत्सुकता घाईची ठरेल का असा सवाल आयएमएसारखी राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांची संघटनाही उपस्थित करते. लस जीवनमान देणारी आहे. मात्र लसीच्या जतनीकरणापासून प्रत्यक्ष लसीकरणाउपरांत उद्भवणाऱया सकारात्मक-नकारात्मक परिणामांची समज सर्वसामान्यांना होणे आवश्यक आहे. मुंबईसह देशात लसीचे ट्रायल सुरू आहे. अशाच ट्रायलदरम्यान हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी लस टोचून घेतली. मात्र त्यांना काही दिवसातच कोरोना संसर्ग झाल्याचे समजले. याचा अर्थ लसीचा परिणाम सुरू झालेला नाही असा घ्यावा का किंवा लस 95 टक्के उपयुक्त मानल्यास उरलेल्या 5 टक्यामध्ये हे आरोग्य मंत्री मोडतात का? शिवाय लसीतून कोरोनाही होऊ शकतो असे तीन वेगवेगळे अर्थ काढल्यास लसीची खात्री कोण देणार असा प्रश्नही उरतोच. ब्रिटनने ट्रायलच्या अपुऱया संशोधनवर लसीकरणला परवानगी दिली. टेस्ट नंतर काहीही होऊ शकते. याचा विचार केलेला दिसत नाही. मात्र हे योग्य नसल्याचे संशोधक सांगत आहेत. शिवाय काही राजकीय व्यक्ती माध्यमातून लस येत आहे, असा गवागवा सध्या करताना दिसतात. या अवाजवी प्रसिद्धीमुळेच लोकांमध्ये लसीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लस बाजारात आल्यावर लसीचे दोन डोस दिले जाणार. या लसीचे दुष्परिणामही असू शकतात. त्यामुळे लसीबाबतची उत्सुकता घाईची ठरू शकते. शिवाय लस जतनीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर जपली पाहिजे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचा भाग मानला आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर दोन प्रकारात विभागले जाणार आहे. साठवणूक आणि लस वहनासाठी. कारखाना ते गोडावून, गोडावून ते रुग्णालय व तिथून पुढे लस केंद्र असे लसीची वाहतूक होऊ शकते. ही लस उणे 25 ते अणे 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर जतन कारणे आवश्यक आहे. यासाठी विशेष शीत प्रक्रिया असणे आवश्यक आहे. ही शीत साखळी कारखाना, रुग्णालय, लस बूथ केंद्र अशा ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अशी शीत साखळी सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. ही शीत साखळी उभारण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. म्हणजे पुढील महिन्यात लस येत असली तरी त्या पुढील किती कालावधीत लसीकरण सुरु होऊ शकते याचे उत्तर मिळत नाही. शिवाय कोरोना ही महामारी असल्याने याचे लसीकरण म्हणजे पोलिओ डोस देण्याइतपत सहज नसल्याचेही डॉक्टरच सांगतात. या लसीकरणासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडू शकते. सध्या कोरोना महामारी प्रतिबंधासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतलेली आहे. अशा स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढल्यास वेगळे मनुष्यबळ कुठून आणणार? त्यामुळे लसीकरणासाठी विशेष प्राशिक्षण देणारी यंत्रणेची गरज आहे. यात नर्सिंग, नर्सिंग विद्यार्थी, पॅरामेडिकल यांना पाचारण करावे लागू शकते. लस येणार अशा वृत्तामुळे लसीकरण म्हणजे चौकाचौकात बूथ उभारून लसीकरण केले जाईल, असे सहज चित्र सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे केले जात आहे. मात्र तसे शक्य नसून लस टोचणे ही शास्त्राrय प्रक्रिया आहे हे विसरून चालणार नाही. लस टोचल्यानंतर निरीक्षण मांडणे आवश्यक आहे. लस टोचणे शास्त्राrय भाग असून त्यानंतरच्या परिणामांचा अभ्यास करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी लस टोचली जाईल त्या बूथ केंद्रावर लस जतनीकरणासाठी तापमान राखणे गरजेचे आहे. लस उणे 25 डिग्री सेल्सिअस एवढय़ा तापमानात टिकणारी असल्याने एक डिग्री सेल्सिअस तापमानाचा फरक पडल्यास लस निकामी होऊन दुष्परिणाम देऊ शकते. जतनीकरणासाठी आवश्यक शीतसाखळी प्रक्रिया विजेवर चालणारी असल्याने आपल्याकडील वीज पुरवठय़ातील अनियमितता लक्षात घ्यावी लागेल.
अमुक कंपनीची लस 90 टक्के उपयुक्त, तमुक कंपनीची लस 95 टक्के उपयुक्त तर तिसऱया कंपनीची लस 80 टक्के उपयुक्त अशा आशयाच्या वृत्ताने कोरोना युद्ध सहज जिंकता येणारे आहे अशी सर्वसामान्यांना आशा निर्माण झाली आहे. हे खरे असले तरी लसीच्या उपयुक्ततेआड फार्मा कंपन्या आपली जाहिरात अधिक करत असल्याचा संशय येत आहे. कोणत्याही लसीच्या संशोधनाचा शास्त्राrय अहवाल राष्ट्रीय शास्त्राrय संस्थेत सिद्धतेसाठी दाखल करावा लागतो. आपल्या देशात असे अहवाल इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर या संस्थेला सुपूर्द करावा लागतो. नंतर संशोधनाचे निष्कर्ष मान्य केले जातात. कोरोना प्रतिबंधावरील कोणतीही लस 50 टक्क्यारून अधिक उपयोगी असली तर मान्य केली जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच घोषित केले आहे. लस टोचली गेली तरी त्या पुढे 1 ते 3 महिन्याचा काळ निरीक्षणसाठी लागणार आहे. तसेच शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास लसीचे दोन डोस आवश्यक आहेत. असे अनेक मूलभूत शास्त्राrय मुद्दे लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. शिवाय लस टोचून घेतल्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर कोरोना प्रतिकार शक्ती निर्माण झाली तरीही ही प्रतिकार शक्ती किती काळ शरीरात राहणार यावर अद्याप कोणी अधिकृत बोलत नाही. जर ही प्रतिकार शक्ती 6 महिने राहणारी असल्यास सिद्धतेनंतरच ही लस 6 महिन्यांनी बाजारात का आणू नये अशा प्रश्नांची उत्तरे सद्य स्थितीत सापडत नाहीत. तसेच ज्यांना नकळत कोरोना संसर्ग झाला आहे अशांनी लस घ्यावी की घेऊ नये असा ही प्रश्न उपस्थित होतोच. ज्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत, अशांना लस दिल्यास काय परिणाम होऊ शकतो याचे स्पष्टीकरणही आवश्यक आहे.
राम खांदारे