प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना देखील सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी गोंधळ निर्माण झाल्याने गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या निवासस्थानी मंत्री आणि अधिकाऱयांची बैठक घेतली. लसीविषयी असणारा गोंधळ शक्य तितक्या लवकर दूर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱयांना प्रथम प्राधान्य द्यावे. प्रत्येक जिल्हय़ातील लसीच्या उपलब्धततेची माहिती अधिकाऱयांजवळ असावी. लस पुरवठा करणाऱया कंपन्यांशी नियमित संपर्कात राहावे. कोरोनाबाधितांना समस्या उद्भवणार नाहीत, अशा तऱहेने प्रत्येक जिल्हय़ांना ऑक्सिजन पुरवठा करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. इस्पितळांमध्ये वेळेत उपचार मिळविण्यासाठी ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना दिल्या.