जिल्हय़ात अजूनही पहिला डोस देण्यासाठी 24 लाख लसींची गरज : पुरवठय़ाअभावी लस उपलब्ध नसल्याचे सांगून नागरिकांना पाठविले जातेय माघारी : दुसरा डोस देण्यावर भर
प्रतिनिधी / बेळगाव
विनायकनगर आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावत आहेत. प्रत्यक्ष साडेनऊनंतर लस वितरणास प्रारंभ केला जातो. लस घेण्यासाठी येणाऱया नागरिकांची गर्दी वाढत असल्याने रांगा लागत आहेत. मात्र, आरोग्य खात्याकडून फक्त 50 लस उपलब्ध करण्यात येत आहेत. अशातही सदर लस देण्यात पोलीस प्रशासन, कोरोना योद्धे व परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना प्राधान्य दिले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांना लस देण्यात येत आहे. परिणामी सामान्य नागरिकांना लस मिळणे कठीण बनले आहे.
लस घेण्यासाठी सकाळी रांगेत उभे राहायचे व लस मिळाली नसल्यास परत दुसऱया दिवशी रांग लावायची, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने विनायकनगर आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येत आहेत. पण लस उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली. काहीजण सकाळी 6 वाजता नागरिकांकडून नावे व आधारकार्ड क्रमांक घेऊन लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण प्रत्यक्षात नावनोंदणी करण्यासाठी व आधारकार्ड क्रमांक घेण्यासाठी अधिकृत कर्मचारीच नियुक्त केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळी नाव नेंदवून घेणारे कर्मचारी नेमके कोण? असा मुद्दा उपस्थित झाला
आहे.
परराज्यांतील नागरिक बेळगावमध्ये
महाराष्ट्रातील चंदगड तालुक्मयात अद्याप लस वितरणास सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी बेळगावात येत असून आपल्या पाहुण्यांमार्फत ओळखीद्वारे लस घेत आहेत. अशावेळी काहीजण 200 ते 300 रुपये रक्कम आकारत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. सर्वच आरोग्य केंद्रांवर मागील पंधरा दिवसांपासून लसीचा पहिला डोस उपलब्ध नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे. टिळकवाडीच्या चौगुलेवाडी आरोग्य केंद्रातदेखील पंधरा दिवसांपासून लसीचा तुटवडा आहे. केवळ दुसरा डोस उपलब्ध असल्याचा फलक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. काही ठिकाणी लस उपलब्ध करण्यात येत आहे. पण केवळ 50 नागरिकांना देण्यात येत आहे. त्यामुळे रांगेत थांबलेल्या उर्वरित नागरिकांना परत जावे लागत आहे. काही ठिकाणी केवळ ओळखीच्या नागरिकांना मागील रस्त्याने लस देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी आता नागरिकांना वशिला लावावा लागत आहे. शहरातील बहुतांशी आरोग्य केंद्रांवर असाच प्रकार असल्याचे आढळून येत आहे.