न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून लहान मुलांसंदर्भात मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. युद्धग्रस्त क्षेत्रातील परिस्थितीसोबत लढत असणाऱया मुलांचा विषय भारताने उचलून धरला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणजे फॉरेन टेररिस्ट फाइर्ट्स (एफटीएफ) म्हटले जाते. हाच शब्दप्रयोग मुलांसाठी वापरल्यास तो कलंकित करणारा असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. यामध्ये भोवतालची परिस्थिती त्यांना कमकुवत बनवत असते, त्यामध्ये मुलांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करुन ही बाब अमानवी असल्याचे नमूद केले आहे. या उलट अशा लहान वय असणाऱया मुलांना आपापल्या देशांमध्ये पाठविणे, पुनर्वसन कार्यक्रम चालविणे आणि त्यांच्या परिवारांची पुन्हा भेट करुन देणे यावर भर देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रामधील उपप्रतिनिधी नागराज नायडू यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे, भारताने मुलांसाठी एफटीएफ शब्दाचा वापर केलेला नाही.