प्रभारी जिल्हा सचिव एल. के. अतिक यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या शाळा सुरू आहेत. याचबरोबर आता अंगणवाडय़ाही सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये तसेच अंगणवाडय़ांमध्ये विद्यार्थ्यांची योग्यप्रकारे काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळत त्यांना शिक्षण व आहार द्या, अशी सक्त ताकीद जिल्हय़ाचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही कोरोनाचा प्रादूर्भाव आहे. त्यामुळेच कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक शाळा तसेच अंगणवाडीला शुद्ध पाणीपुरवठा करावा, सरकारच्या आदेशानुसार देण्यात येणारा आहार द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह महत्त्वाची आहेत. त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरवा, योग्यप्रकारे वसतिगृहांमध्ये स्वच्छता तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना भेट दिली जाणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या अडीअडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकाऱयांनी या वसतिगृहांची पाहणी करण्याची सूचनादेखील त्यांनी यावेळी केली.
काही ठिकाणी वसतिगृहे बांधण्याची कामे प्रलंबित आहेत. ती वसतिगृहे शहरापासून तसेच गावापासून अधिक दूर असू नयेत. त्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरापासून तसेच गावापासून जवळच वसतिगृहांची निर्मिती करावी. विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती देण्यासाठी पावले उचलावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जलजीवन योजनेंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करा
जलजीवन योजनेंतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करणे, याचबरोबर ग्रामस्थांनाही या योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे एल. के. अतिक यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी केंद्रामध्ये काही जागा रिक्त आहेत. त्या जागांवर तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. अंगणवाडीमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱया आहाराचा दर्जाही तपासण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत.
अंगणवाडी केंद्र बांधण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहेत. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अंगणवाडी उभारणीसाठी आराखडा तयार करावा. त्याची सर्व माहिती वरि÷ अधिकाऱयांकडे पाठवावी, अधिकाऱयांनी समन्वय साधून आवश्यक ती योजना राबवावी. अंगणवाडी उभारणीसाठी अधिक प्राधान्य देण्याकडेही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. प्राथमिक, माध्यमिक शाळांची दुरुस्ती करण्यासाठी तालुका पातळीवरील अधिकाऱयांची बैठक घ्यावी. त्यामध्ये चर्चा करून दुरुस्ती करण्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावामध्ये तलाव असणे महत्त्वाचे आहे. ज्या गावांमध्ये तलाव नाही त्या गावांमध्ये तलाव खोदाईसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तलावांमुळे जलपातळी वाढण्यास मदत होते. याचबरोबर शेतीलाही फायदा होतो. तेव्हा अधिकाऱयांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
लसीकरणाबाबत सूचना
कोविड लसीकरणासाठी निर्धारित उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हय़ातील चार तालुक्मयांमध्ये लसीकरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या तालुक्मयांमध्ये लसीकरणासाठी गती द्यावी. लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी योग्य तो सर्व्हे करून लसीकरण मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले.
रब्बी पेरणीसाठी बी–बियाणे आणि खते उपलब्ध करा
खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आता रब्बी पिकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचा सर्व्हे करणे गरजेचे आहे. रब्बी हंगामात शेतकऱयांना लागणारी बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी यावेळी कृषी अधिकाऱयांना सांगितले.
जलजीवन मिशनसाठी गावकऱयांचा सल्ला घ्या
जलजीवन योजनेंतर्गत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱया योजनांबाबत गावकऱयांशी चर्चा करावी, त्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा, ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच आणि त्यांच्या सूचनांनुसारच आराखडा तयार करून योजना राबवा, असे एल. के. अतिक यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी विविध योजनांतर्गत काही गावांमध्ये नळजोडणी केली आहे. त्याच नळजोडणींना नवीन जलजीवन योजना जोडण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे वेळ आणि खर्चदेखील वाया जाणार नाही. सरकारनेही काही आदेश दिले आहेत, त्या आदेशांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण करा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्हय़ामध्ये कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. त्या लसीच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचे सांगितले. ज्या तालुक्मयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन युनिट बसविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, प्रांताधिकारी शशीधर बगली, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, जिल्हा नगरविकास नियोजन संचालक ईश्वर उळागड्डी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.