कर्मचारी भरती अडकली लालफितीत : बेळगाव तालुक्मयात 188 तर खानापूरमध्ये 132 पदे रिक्त
बेळगाव / प्रतिनिधी
हेस्कॉममध्ये कर्मचारी भरती तर झाली, परंतु नियुक्ती नसल्याने सध्या अनेक पदे रिक्त आहेत. एका लाईनमनवर पाच ते सहा गावांची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कर्मचाऱयांची संख्या वाढविली जात नसल्याने त्याचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे. दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्याने वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. बेळगाव तालुक्मयात 188 तर खानापूर तालुक्मयात 132 पदे रिक्त असल्याने हेस्कॉमचा कारभार रामभरोसे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक गावामध्ये विजेच्यासंदर्भात येणाऱया दुरुस्तीसाठी लाईनमन व साहाय्यक लाईनमनची व्यवस्था करण्यात येते. गावच्या व्याप्तीत येणाऱया ग्राहक संख्येवरून कर्मचाऱयांची संख्या ठरविली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरतीच झाली नसल्याने कर्मचाऱयांवरील ताण वाढला आहे. ज्या ठिकाणी 4 कर्मचाऱयांची गरज आहे, त्या ठिकाणी केवळ 1 ते 2 कर्मचारी काम करत आहेत. पावसाळय़ात विजेच्या समस्यांमध्ये वाढ होते, त्यावेळी उपलब्ध कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागते. आज प्रत्येकाला विजेची आवश्यकता असल्याने कोणीही दोन-दोन दिवस विजेविना राहू शकत नाही. त्यामुळे निरंतर वीजपुरवठा करण्यासाठी कर्मचाऱयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
2018 च्या भरतीचे घोडे अडले कुठे?
लाईनमन (पॉवरमन) ची संख्या कमी असल्यामुळे बेळगावमध्ये 2018 साली भरती करण्यात आली होती. यामध्ये बेळगावसह इतर जिल्हय़ांमधील शेकडो तरुण सहभागी झाले होते. रनिंग, खांबावर चढणे यासह इतर शारीरिक व लेखी परीक्षेनंतर तरुणांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. परंतु याच दरम्यान नवीन सरकार सत्तेत आल्यामुळे या भरतीला खो बसला. अंतिम यादी तयार असूनही राज्याच्या महसूल विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने भरती थांबविण्यात आल्याची माहिती विद्युत विभागातील सूत्रांनी दिली. 3 वर्षे उलटली तरी निवड झालेले उमेदवारही नोकरीविना अडकून पडले आहेत. त्यामुळे भरतीचे घोडे अडले कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार वाहने चोवीस तास सेवेत
भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने प्रत्येक गावात कर्मचाऱयांची उणीव जाणवत आहे. त्यामुळे हेस्कॉमने चोवीस तास सेवा देणरी वाहने देण्याचा निर्णय घेतला होता. एक वाहन त्यामध्ये उंचावर चढण्यासाठी ऑटोमॅटिक शिडी, तसेच 7 कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्मयासाठी 2 तर खानापूर तालुक्मयासाठी 2 अशी 4 वाहने देण्यात आली आहेत. यामुळे बिघाड झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती करणे सहज शक्मय होत आहे.
खानापूर तालुक्मयातील ग्राहकांचे हाल
खानापूर तालुक्मयातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यात एका लाईनमनवर पाच-सहा गावांची जबाबदारी असल्याने पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये पोहचणे शक्मय नसते. त्यामुळे दोन-तीन दिवस नागरिकांना अंधारात काढावे लागत आहेत. बऱयाच गावांमध्ये हीच परिस्थिती असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. फोन लावला असता कर्मचारी संख्या कमी असल्याने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे लवकर कर्मचारी भरती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कंत्राटी कामगारांची घेण्यात येत आहे मदत
बेळगाव व खानापूर तालुक्मयात लाईनमन व साहाय्यक यांची संख्या अत्यल्प आहे. यासाठी कंत्राटी कामगारांची मदत घेतली जात आहे. या दोन्ही तालुक्मयांसाठी 24 तास सेवा देणारी वाहने देण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा बिघाड होताच ही वाहने त्या त्या गावांमध्ये पाठवून दिली जातात. कर्मचाऱयांची भरती लवकर करावी यासाठी वरि÷ांनाही माहिती देण्यात आल्याचे बेळगाव व खानापूर तालुक्मयाचे कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार चिकाडे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
प्रवीणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण)
बेळगाव व खानापूर तालुक्मयातील रिक्त पदे
पद | बेळगाव तालुका | खानापूर तालुका |
साहाय्यक अभियंता (एसओ) | 5 | – |
कनिष्ट अभियंता (एसओ) | – | 5 |
मेकॅनिकल (वरिष्ट) | 5 | 4 |
मेकॅनिकल (कनिष्ट) | 4 | 7 |
पॉवरमन (लाईनमन) | 65 | 34 |
साहाय्यक लाईनमन | 104 | 72 |
कनिष्ट लाईनमन | 5 | 10 |
एकूण | 188 | 132 |