प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून-मधून कोसळणाऱया जोरदार सरींनी रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी नदीला आलेल्या प्रचंड पूराचे पाणी लगतच्या शेतात घुसून त्यात लावणी केलेली भातशेतीच वाहून गेली आहे.
गेल्या आठवडाभराहून अधिक काळ पावसाने दडी मारलेली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने कडक उन्हाचे चटके ऐन पावसाळय़ात नागरिकांना सोसावे लागत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने येथील शेतकरीही मोठय़ा चिंतेत आहे. मात्र पाणथळीच्या शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात देखील नदीलगतच्या भागात तेथील शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात भातशेतीची लावणी नुकतीच करून ठेवली होती.
सोमवारी सायंकाळनंतर या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे तेथील नदीला मोठा पूर आला होता. दुथडी भरून वाहणाऱया नदीने आपल्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने पूराचे पाणी लगतच्या शेतांमध्ये घुसले. त्यामुळे लावणी केलेली भातशेतीच वाहून गेली. तर पूराच्या पाण्यामुळे दगड-धोंडय़ांचा प्रचंड गाळ सुपिक शेतीत येऊन साचल्याने तेथील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनस्तरावर या झालेल्या नुकसानीची दखल घेतली जावी अशी तेथील शेतकऱयांमधून मागणी होत आहे.