लाटंबार्से / वार्ताहर
‘कोरोना’ ने देशात भीतीचे वातावरण पसरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाकेला दि. 22 मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनला जनतेनेही सकारात्मक प्रतिसाद देला आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लाटंबार्से परिसरातील ग्रामीण भागातील लोकांची खूपच ओढाताण होत आहे. काही ठिकाणी असाहाय्य गरीब होतकरू लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचलेल्याच नाहीत. निवडणुकीवेळी मते मागण्यासाठी येणाऱया राजकारण्यांनीही काही ठिकाणी फार दुर्लक्ष केले आहे. जीवनावश्यक वस्तू सोडाच निदान आपल्या मतदारसंघात फिरून काहींनी साधी विचारपूसही केलेली नाही असे येथील परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना बाहेर पडायला मिळत नाही. घरात बसून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाकेला प्रतिसाद द्यावा लागत आहे. काही ठिकाणी राजकीय फायदा उठविण्यासाठी आपल्या बाजूंच्या कुटुंबीयांना सामानाचे वाटप केले.
रेशनवरील धान्य मिळविण्यासाठी लोकांची वाढती गर्दी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गोवा राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात येणाऱया सर्व रेशनकार्डधारकांना प्रती माणसी 5 किलो एवढा अतिरिक्त धान्य कोटा तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येणार आहे. एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यांत हा साठा मिळणार आहे. याव्यतिरिक्त धान्याचा लाभ एफवाय व पीएचएच या कार्डधारकांना मिळणार आहे. हे धान्य लाटंबार्से परिसरातील लोकांसाठी कासारपाल येथील कासारपाल ग्रुप वि. का. स. सेवा सोसायटी या धान्य दुकानात मिळणार आहे. या धान्य दुकानात अतिरिक्त धान्याबरोबरच महिन्याचे धान्य मिळविण्यासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. पण हे धान्य पुरवठा करणारी सोसायटी व त्यांचे कर्मचारी कामाचा एवढा व्याप वाढलेला असतानाही लोकांना ठरलेल्या कामकाज वेळेनुसार धान्य वितरित करीत आहेत.
धान्य पुरवठा करणाऱया कर्मचाऱयांचा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काम करणाऱया डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांना 25 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली त्याप्रमाणे सरकारने दखल घेवून अशा कर्मचाऱयांचाही पगारवाढ देणे गरजेचे आहे. कासारपाल ग्रुप वि. का. स. सेवा सोसायटीमध्ये सध्या एक कर्मचारी त्या त्या कुटुंबातील रेशनावरील यादीसहीत आपल्या नोंदणीकृत वहीत लिहून ती डिचोली नागरी पुरवठा खात्याकडे जमा करण्यापर्यंत तर एक कर्मचारी ते धान्य लोकांना वितरित करीत आहे. या कालावधीमध्ये काहीतरी अतिरिक्त फायदा मिळावा अशी मागणी कर्मचाऱयांनी केली आहे.
सरकारची ही चांगली योजना असल्याने या लॉकडाऊनच्या काळात कोणतीच दळणवळणाची सोय नसतानाही वयोवृद्ध महिला हे धान्य आपल्या डोक्मयावर घेऊन काही मैल चालत जाऊन आनंदाने आणीत आहे.
सरकारकडून निराधार महिलांना मिळणारे वेतन लवकर बँकेत जमा करा
लाटंबार्से परिसरातील एकमेव स्टेट बँकेचे एटीएम मशीन कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत पहावयास मिळत आहे. त्यामुळे या परिसरात एकच एटीएम मशीन असल्याने लोकांची कुचंबणा होत आहे. म्हणजे हे एटीएम मशीन असून नसल्यासारखे वाटत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना पैशाची चणचण भासत असताना त्यातच निराधार महिलांसाठी महिन्याकाठी मिळत असलेले दयानंद सामाजिक योजनेचे पैसेही खात्यात न जमा केल्याने अशा महिला लाटंबार्सेतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत येऊन हे पैसे कधी जमा होणार असल्याची विचारणा करीत आहेत. सरकारने निराधार महिलांचे पैसे या आणीबाणीच्या काळात लवकर जमा करून निराधार महिलांना साहाय्य करावे अशी मागणी होत आहे.