अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 17 जानेवारी 2022, सकाळी 11.00
● हॉस्पिटलायझेशन केवळ 3.36 टक्के
● लोक आजारी पडतात पण येईनात दवाखान्यात
● निर्बंध दाखवणाऱ्याला बसतेय थोबाडीत
● घरात चार दिवसांत सारे ठणठणीत होताहेत
● आकड्यांना राहिलं नाही महत्व
सातारा / प्रतिनिधी :
दोन वर्षांपूर्वी आलेली महामारी आता केवळ महालागण राहिली आहे. महामारीचा फायदा घेऊन नाडणाऱ्या लोकांना अजून एखादी लाट यावी असं वाटतंय. पुन्हा एकदा पॉझिटिव्ह येण्याचा आकडा वाढत असला तरी हॉस्पिटलाझेशन केवळ 3 टक्के झालं आहे तर मृत्युदर शून्यखाली गेला असल्याने लाटाप्रिय लोकांना रडू कोसळलं आहे. सोमवारचा आकडा जरी 793 इतका असला तरी या शासकीय आकड्यांना कोणीही भीक घालत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, आजूबाजूला अनेक लोक पॉझिटिव्ह आले असले तरी ते तीन – चार दिवसांत ठणठणीत होत असल्याचे अनुभव साऱ्यांना येत असल्याने उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण तयार होत आहे. लाटेची भीती दाखवून जनतेला नाडायचे शासनाचे प्रयत्न धुळीला मिळाले आहेत. सर्वत्र खाजगी शाळा सुरूच असून शासकीय पगार मिळणाऱ्या शाळा मात्र बंद आहेत. “दारुदुकाने हाऊसफुल्ल आणि कॉलेज बंद” असल्या बुद्धीच्या शासनाचे कोणी-काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
थोडक्यात,
हॉस्पिटलाझेशन 3 टक्के, सिरीयस इलनेस एक टक्क्यांच्या खाली तर डेथरेट शून्य टक्क्यांच्या खाली आला असेल तर कोणीही घाबरणार नाही त्यामुळे लाटाप्रिय लोकांनी किंवा ज्यांच्या घरी शासकीय पगार येतो त्यांनी निर्बंध लादण्याच्या भीतीचा बागुल केला तर गंभीर प्रतिक्रिया येतील असे समाजात वातावरण आहे.
सोमवार
नमुने – 2,713
बाधित – 793
मृत्यू – 0
सक्रिय रुग्ण – 5,566
सोमवारपर्यंत
नमुने – 24,35,848
बाधित – 2,60,166
मुक्त – 2,46,101
मृत्यू – 6,508