वार्ताहर/ औंध
तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर सामान्य माणसाशी नाळ जोडलेली लालपरी काल रस्त्यावर धावली. मात्र प्रवाशांचा तीला थंडा प्रतिसाद मिळाला. वडूज आगाराच्या 18 फेयातून काल फक्त 1010 उत्पन्न मिळाले.
24 मार्चला लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर एसटी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. एसटीचे चाक थांबल्यामुळे सगळेच ठप्प झाले होते. भारमान अभियान सुरू असताना कोरोनामुळे अचानक ब्रेक लागल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले होते. कोरोनाचा विळखा वाढत चालल्याने संसर्ग रोखण्यासाठी लालपरीला सक्तीने विश्रांती घेणे भाग पडले. मात्र आजही एसटी ग्रामीण भागातील लोकांचे अविभाज्य अंग आहे. एसटी सुरू झाल्याशिवाय अर्थकारण गतिमान होणार नाही. यासाठी शासनाने टप्प्याटप्याटप्याने लाँकडाऊन मध्ये शिथीलता आणली आहे. यामुळे नियमांचे पालन करुन एसटी सुरू करण्याचा निर्णय झाला यामुळे काल तब्बल दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लालपरी रस्त्यावर धावली. परंतु अद्याप कोरोनाचे भूत मानगुटीवरुन उतरले नसल्याने प्रवाशांचा काल थंडा प्रतिसाद मिळाला. प्रवासी नसल्याने अनेक ठिकाणी रिकाम्या फेया कराव्या लागल्या.
वडूज आगाराच्या वतीने देखील काल एसटीच्या फेया कोठून कोठे होणार आहेत याचे वेळापत्रक निश्चित केले होते. परंतु पहिल्या दिवशी प्रवाशांची प्रतिक्षा करावी लागली. सुरक्षित अंतर ठेवून फेया सुरू होत्या मात्र तेवढेही प्रवासी काल उपलब्ध झाले नाहीत. तरी देखील नुकसान सोसून आज पहिला दिवस असल्याने एसटी धावली. मोठय़ा प्रतिक्षेनंतर काल सामान्यांची लालपरी काल धावली. आणि एसटी सुरू झाल्याचा संदेश काल लोकांच्या पर्यंत पोहचला. सध्या प्रवाशांची संख्या बोटावर मोजता येईल एवढी असली तरी हळूहळू दिवस बदलतील आणि प्रवाशांचा लोंढा येईल असा विश्वास एसटी महामंडळाला आहे.
चौकट काल शासनाने दिलेल्या आदेशानुसार एसटी सेवा सुरू झाली आहे.त्यासाठी वडूज आगारच्या वडूज सातारा, वडूज कराड या मार्गावरील फेया निश्चित केल्या होत्या. प्रत्येक फेरीनंतर बस निर्जंतुक करण्यात आली. शिवाय चालक वाहकांना मास्क सँनिटायझर पुरविण्यात आले आहे. प्रवाशांनी देखील मास्क वापरून प्रवास करावा. सध्या प्रवाशांची