ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लाल किल्ल्यावर 26 जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याच्या खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रॅंचच्या (SIT) चौकशीतून समोर आला आहे. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये सहभागी होऊन उपद्रव वाढविण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. इकबाल सिंग हा या काटातील महत्वाचा चेहरा होता. त्यानेच लाल किल्ल्यात जमाव जमवून लाहोर दरवाजा तोडण्यास जमावाला भडकावले. लाल किल्ल्यावर सर्वात वर आपल्या धर्माचा झेंडा लावण्याची त्याची इच्छा होती.