ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योगी सरकारला चारी मुंड्या चीत करण्यासाठी विरोधकांनी प्रचार मोहीमांचा वेग वाढवला असुन याच पार्श्वभुमीवर समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. यावेळी बच्चन यांनी टीका केली आहे. जसे-जसे उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे-तसे लाल टोपीला इतके घाबरले आहेत, की लोकार्पण आणि उद्घाटनांचा धडका लावला असल्याची टीका समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ सरकारवर केली आहे. त्या आज सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मोदी आणि योगी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी बोलताना बच्चन पुढे म्हणाल्या, काशी विश्वनाथ मंदिर चांगल्या प्रकार बांधण्यासाठी तेथील छोटी-छोटी दुकाने होती ती तुम्ही हटवली. तुम्ही त्यांना मोबदला दिला का ?, असा प्रश्न त्यांनी योगी सरकारला विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी लाल टोपीपासून धोका असल्याचे उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यालाही जया बच्चन यांनी काही दिवसांपासून प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे बच्चन यांच्या या टीकेला भाजप कसे प्रतिउत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.