ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जर्मनीच्या ‘लुफ्थान्सा’ विमान कंपनीने आजपासून (दि.30) 20 ऑक्टोबरपर्यंत भारत-जर्मनीमधील सर्व विमान उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. लुफ्थान्साने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
कोरोना काळातील विमान उड्डाणांच्या प्रस्तावावरून लुफ्थान्सा आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयात वाद सुरू आहे. ऑक्टोबरमधील ठरलेल्या वेळापत्रकानुसार उड्डाणे करण्यास भारत सरकारने नकार दिल्याने लुफ्थान्साने 20 सप्टेंबरपर्यंत भारत आणि जर्मनीमधील सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सरकारने लुफ्थान्साला आठवड्याला सात विमानांच्या उड्डाणाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, लुफ्थान्साने तो प्रस्ताव नाकारत आठवड्याभरातच 20 विमान ऑपरेट केल्याचे समोर आले. त्यावरुन लुफ्थान्सा आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयात वाद सुरू झाले.