वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यांना विश्वासात न घेताच केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय करण्याची मोठी चूक केली, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीराप्पा मोईली यांनी रविवारी केली. कोरोना महासाथीविरोधात लढा देण्यासाठी रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस नेतृत्वाखालील राज्यांनी कोरोना संशयित रुग्णांच्या चाचणी करण्यास प्राधान्य दिले आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदी यांनी 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी देशातील सर्व राज्य सरकारांना विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र सरकारने हा निर्णय एकांगी घेतला, असेही ते म्हणाले.