एकनाथ गावकर/ केपे
राज्यातील काजू हंगाम सुरू झाला असून अचानक देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने त्याचा फटका गोव्यातील काजू उत्पादकांनाही बसला आहे. राज्यात सर्वच व्यवहार बंद असल्याने काजूचे पीक घेणारे ग्रामीण भागांतील शेतकरी हताश झाले आहेत. काजू कुठे विकायचा हा प्रश्न सध्या शेतकऱयांना पडला आहे.
तसेच काजू विकत घेणाऱया संस्थांनी यंदा काजू घेतला नाही, तर गोव्यात उत्पादित केल्या जाणाऱया लाखो टन काजूचे काय करायचे असा प्रश्नही सध्या मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांना सतावत आहे. कारण ग्रामीण भागांतील शेतकऱयांचे हे मुख्य उत्पन्न असते आणि त्यावर त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे या परिस्थितीचा मोठा फटका शेतकऱयांना बसू शकतो. राज्यात अनेक कृषी संस्था आहेत, मात्र लॉकडाऊन असल्याने कोणीच यावर भाष्य केलेले नाही.
लॉकडाऊन संपल्यानंतर काजू घेऊ : वेळीप
मात्र शेतकऱयांनी घाबरून न जाता थोडा धीर धरावा. लॉकडाऊन संपल्यानंतर आदर्श सोसायटी काजू विकत घेईल, असा दिलासा माजी कृषिमंत्री व आर्दशचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी दिला आहे. देशभरात जे कोरोना विषाणूचे संकट आले आहे त्याला रोखण्याकरिता लॉकडाऊन गरजेचे आहे. लॉकडाऊननंतर काजू घेतला जाईल. तेव्हा कुठल्याही शेतकऱयाने घाबरून जाऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱयांच्या हिताची काळजी आहे. मात्र सध्या जे संकट आले आहे त्यावर सर्वांनी एकत्र येऊन मात केले पाहिजे, असे वेळीप यांनी म्हटले आहे.
शेतकऱयांनी घाबरून जाऊ नये
पंतप्रधान मोदी शेतकऱयांचा नक्कीच विचार करतील तसेच राज्य सरकारही त्या नजरेतून पावले उभारेल. काजू काढून त्याची विक्री करण्यासाठी उत्पादकांना दरवर्षी किमान 90 दिवस तरी मिळायचे. मात्र यंदा एक ते दिड महिना मिळेल. पण यामुळे शेतकऱयांनी हताश होऊ नये. आदर्श या संस्थेचे गेली 27 वर्षे शेतकऱयांशी नाते आहे. तसेच सुमारे 27 हजारांहून जास्त शेतकरी या संस्थेकडे निगडीत आहेत. त्यांनी घाबरण्याची गरज नसून त्यांचे सर्व काजू उत्पन्न आदर्श विकत घेईल, असे वेळीप यांनी सांगितले.
जूनपर्यंत काजू विकत घेणार
मात्र यंदा शेतकऱयांनी काजू दोन वेळा तरी उन्हात वाळवून चांगल्या रीतीने पॅकबंद करून ठेवावेत. जूनपर्यंत काजू घेऊ. मागच्या वर्षी 230 ट्रक इतका काजू आर्दशने निर्यात केला होता. त्यामुळे संस्थेशी निगडीत केपे, सांगे, काणकोण व इतर भागांतील शेतकऱयांनी हताश होऊ नये. शेतकऱयांच्या सोबत आम्ही आहोत. यंदा काजू विकत घेण्यात सुरुवात केली होती. 6 ट्रक इतके काजू विकत घेतले होते. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा 134 रु. असा दर होता, याकडे वेळीप यांनी लक्ष वेधले.
मात्र सर्वच व्यवहार बंद झाल्याने काही अडचणी आल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर काजू विकत घेऊ व तशी बोलणीही आंचल इंडस्ट्रिजकडे केली आहेत. देशात आलेल्या महामारीतून पहिल्यांदा सुटका करून घेणे गरजेचे आहे. याकरिता पेंद्र सरकार व राज्य सरकार पावले उचलत आहे, असे वेळीप यांनी सांगितले. शेतकरी हा जगाचा केंद्रबिंदू आहे. आज जो किराणामाल व भाजीपाला उपलब्ध होत आहे तो शेतकऱयांनी घेतलेल्या कष्टांमुळे मिळत आहे. यामुळे शेतकऱयांचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे वेळीप यांनी सांगितले .
संबंधित संस्थांकडून काजू विकत घेतला जाणार की नाही असा प्रश्न सर्वांसमोर असल्याने राज्यातील बऱयाच काजू उत्पादकांकडून सरकारने काजू विकत घ्याव्या अशी मागणी व्हायला सुरुवात झाली होती. पण आदर्श सोसायटीने काजू विकत घेऊ असे सांगून त्यांच्याकडे संबंधित शेतकऱयांना दिलासा दिला आहे.