जान्हवी पाटील/ रत्नागिरी
लॉकडाऊन मुळे 22 मार्चपासून पूर्णपणे एसटी सेवा बंद झाली जवळपास 22 मे पर्यंत बंदच होती, प्रशासनाने शिथिलता आणल्याने 8 दिवसापासून जिल्हा अंतर्गत सेवा सुरू झाली असली तरी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे मात्र या लॉकडाऊनमध्येही एसटी चे 10 कोटी उत्पन्न आहे हे 10 कोटी सरकार एसटी ला देणार आहे. 10 हजारहुन अधिक मंजूर, नागरिकांना एसटीने त्यांच्या गावी सोडण्यात आले परिणामी जवळपास 10 कोटी रुपये रत्नागिरी चे येणे आहे. असे असले तरी 65 दिवसाचे नुकसान 49 कोटी रुपये झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.
लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग, व्यवसायाचे कोटय़वधी चे नुकसान झाले, मुळातच तोटय़ात असणारी एसटी सेवा आता पूर्णपणे नुकसानीत असूनदेखील स्वतःला सावरत आहे. लॉकडाऊन चा नुकसानीचा आकडा 49 कोटींवर पोहचला आहे, दररोज 7 हजार फेया एसटी विभागातून सुटत होत्या, आता जिल्हा अंतर्गत सेवा सुरू झाली असली तरी 40 ते 50 टक्के प्रतिसाद असून एका बसमध्ये 10 ते 15 प्रवाशी घेऊन जावे लागते त्यामुळे याचे उत्पन्न हजारात असून तिकीट दरही स्थिर आहे, जिल्हा अंतर्गत सेवेचा नुकसानीचा अहवाल अद्याप तयार नसला तरी ते दररोज लाखात नुकसान असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने ’तरुण भारत’ शी बोलताना दिली आहे.
22 मे पासून रत्नागिरी जिल्हयात एसटी सेवा सुरू झाली जवळपास 52 फेया सूरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये 20 ते 22 गाडय़ा सुरळीत सुरू आहेत सोशल डिस्टस्टींग ची अंमलबजावणी म्हणून एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशी मात्र मुळातच सध्या नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय तालुक्याबाहेर प्रवास करत नाही जेमतेम 10 ते 12 प्रवाशी येतात, त्यामुळे नुकसानीत जाऊन या प्रवाशानांना एसटी सेवा देत आहे.
जवळपास 80 टक्के चालक वाहक कर्मचारी आज डेपोत केवळ येऊन जातात कारण त्यांना कामच नाही आहे. त्यामुळे केवळ प्रत्येक डेपोतून दररोज 5 ते सहा कर्मचार्यांनाच बोलावले जाते, गाडय़ानुसार कर्मचारी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव यांनी दिली.
मुळात एसटी सरकार आधीच कोटय़वधी रुपये देणे असून आता रत्नागिरी जिह्याची 10 कोटींची त्यात भर पडली आहे असे राज्यातील अनेक विभागांचे शासन आता देणेकरी आहे, जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा खरा नफा एसटी विभागांना होणार आहे.