नवी दिल्ली :
कोरोना विषाणुच्या वाढत्या विळख्यामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. परंतु या संकटातही काही जीवनाश्यक सेवा सुरु आहेत. यात खरेदी आणि लॉजिस्टीक्ससंबंधी समस्या निर्माण होत असतानाच्या कालावधीतही जन औषध केंद्रांतून एप्रिल महिन्यात 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
यासोबतच रसायन आणि उर्वरक मंत्रालयाच्या माहितीनुसार या केंद्रांनी मागील वर्षात एप्रिलमध्ये 17 कोटी रुपये आणि मार्च 2020 मध्ये 42 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री केल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वस्त औषधांना मागणी
जनऔषध केंद्रातून विकण्यात येणाऱया औषधांच्या किमती या बाजारात विकण्यात येणाऱया औषधांच्या किमतीपेक्षा 50 ते 90 टक्क्मयांनी स्वस्त असतात. देशातील नागरिकांना स्वस्त औषधांची पूर्तता करण्यासाठी 726 जिल्हय़ांमध्ये 6,300 पेक्षा जास्त जनऔषध केंद्रे कार्यरत आहेत.