ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊन काळात बंद असलेली मासेमारी आणि त्याची विक्री पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने आज परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशात आज पाचवी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे आता लॉकडाऊन काळातही मासे पकडने, त्यावर प्रक्रिया करणे, विक्री व वाहतूक करणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील एक पत्रक केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे.
मासेमारी संदर्भातील सर्व गोष्टींना केंद्र सरकारने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच खवय्यांना आता बाजारपेठेत मासे उपलब्ध झाल्याने मस्यांची चव चाखता येणार आहे.