11 लाख 12 हजार 700 रूपयांचा दंड वसूल : जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई
प्रतिनिधी / ओरोस:
लॉकडाऊन कालावधीत वाहतूक नियम मोडणाऱंयावर जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने कडक करवाई केली जात आहे. आतापर्यंत वाहन चालवताना हेल्मेट नसणे, कागदपत्रे नसणे आदी प्रकारच्या 3912 केसेस करण्यात आल्या असून त्यांच्याकडून 11 लाख 12 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
22 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणारे लोक वगळता अन्य काही लोक आपली वाहने रस्त्यावर फिरवत होते. त्यामुळे विनाकरण रस्त्यावर फिरणाऱया आणि वाहतूक नियम मोडणऱया वाहन चालकांवर करवाई करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. पी. पवार आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने वाहतूक नियम मोडणाऱयांवर कडक करवाई केली आहे. यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन विभाग करून करवाई करण्यात आली आहे.
वाहन परवाना संपलेला असतानाही वाहन चालविल्याच्या 98 केसेस करण्यात आल्या असून 49 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कागदपत्रे अपूर्ण असल्याप्रकरणी 177 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधून 35 हजार 400 रूपये दंड, तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे 1373 गुन्हय़ांमधून 2 लाख 74 हजार 600 रुपये, पीयुसी नसणे 342 केसेस करण्यात आल्या असून यातून 68 हजार 400 रूपये. पोलिसांनी सिग्नलबाबत केलेला इशारा न पाळणे 107 केसेस करण्यात आल्या असून 21 हजार 400 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट नसणे 970 केसेस 4 लाख 85 हजार रूपये दंड, सिटबेल्टचा वापर न करणे 192 केसेस 38 हजार 400 रूपये दंड, वाहनांना आरसा नसणे 350 केसेस 70 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊन कालावधीत वाहतूक शाखेने जिल्हाभरात विविध ठिकाणी केलेल्या 3912 केसेसमधून 11 लाख 12 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे सांगितले. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत आणि विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरू नये असे आवाहन ही वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.