व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दय़ावी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने रत्नागिरी जिह्यातील माडी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने माडी दुकानांची परवाना फी भरून घेतलेली असताना गल्या दोन महीन्यांपेक्षा अधिक काळ ही सर्व दुकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी माडी व्यावसायिक संघटनेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिह्यातील हा व्यवसाय करणारा वर्ग काहीच काम नसल्याने बेकार अवस्थेत घरीच बसून आहे . त्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे . सध्या मुंबई, पुणे आदी ठीकाणी नोटबंदीनंतर कित्येक उदयोग बंद पडल्याने शेकडो तरूण आपल्या गावात माडी व्यवसायाकडे वळले आहेत. घराघरात दहा – वीस माडांची माडी काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सागर किनाऱयावरील गावागावात भंडारी समाजातील तरुणवर्ग हा माडी व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर करीत आहे.
मात्र व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्या कुटुंबाला हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या व्यवसायाला लवकरात लवकर सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी असंख्य तरुण वर्गाकडून केली जात आहे. शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दरवर्षी जिल्हाधिका – यांच्या मार्गदर्शनाखाली माडी दुकानांची लिलाव प्रक्रिया करण्यात येते . त्यातून शासनाला लक्षावधीचा महसूल मिळतो. सन 201 9 -20 सालासाठी मात्र शासनाकडून काहीवेळा एक , दोन महीने व आता मार्च महिन्यात सहा महिन्यांचे पैसे भरून घेण्यात आले. काही दिवसातच जिल्हाधिका – यांच्या आदेशाने 19 मार्च, 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दुकाने बंद करण्यात आली. व्यावसायिकांनी कर्ज काढून लाखो रूपये भरले आहेत .
व्यावसायिकांनी केरळ, तामिळनाडू येथील मजूर माडी उत्पादन करण्यासाठी ठेवले आहेत. त्यांना हजारों रुपये पगार द्यावा लागत आहे. माडी विक्रीसाठी भाडय़ाने जागा घेण्यात आल्या आहेत. त्याकरीता जागामालकांना डिपॉझिट देण्यात आली आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक ही रक्कम कशी भागवणार या विवंचनेत सापडले आहेत . तरी शासनाने या व्यवसायाबाबत गांभिर्याने विचार करावा, आणि माडी व्यवसाय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी अशी मागणी अध्यक्ष प्रसन्न सुर्वे, सचिव लक्ष्मीकांत भुते ,खजिनदार महेश शिरधनकर, व्यवसायिक प्रशांत मयेकर, भाटकर यांनी केली आहे.
माडीमुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती
राजापूर तालुक्यातील जैतापूर गावचे माजी सरपंच व माडी व्यावसायिक गिरीश करंगुटकर यांनी सांगितले की माडी ही रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते . शिवाय नैसर्गिक द्रव्य आहे. शरीराला गुणकारी असल्याचे सांगितले.