73 कि.मी.चा होणार रेल्वेमार्ग : प्रकल्पासाठी अंदाजे 988 कोटी रुपयांचा आराखडा तयार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-धारवाड (व्हाया कित्तूर) हा रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. या नवीन मार्गासाठी 335 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे 988 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे रेल्वेमार्गाच्या कामाला पुन्हा एकदा बेक लागला आहे.
सध्या बेळगाव ते धारवाड हा रेल्वेमार्ग लोंढामार्गे आहे. परंतु हा मार्ग खानापूर तालुक्मयातील घनदाट जंगलातून असल्याने रेल्वेच्या गतीवर मर्यादा येत आहेत. तसेच प्रवाशांचा विनाकारण वेळ जात असल्याने व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाची पाहणी करण्यात आली. यामुळे अंतर कमी होणार असून वेळही वाचणार आहे. त्यामुळेच माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी आपल्या कार्यकाळात हा रेल्वेमार्ग मंजूर करून आणला.
भू-संपादनाची प्रक्रिया कधी?
बेळगाव व धारवाड या दोन जिल्हय़ांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. यासाठी एकूण 335 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भू-संपादनाची प्रक्रिया एप्रिलपासून केली जाणार होती. परंतु कोरोनामुळे ती आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आधीच हा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला होता. आता कोरोनामुळे रखडत चालला आहे.
50 टक्के रक्कम राज्य सरकार देणार
सदर रेल्वेमार्ग राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 50 टक्के रक्कम केंद्र सरकार तर 50 टक्मके रक्कम राज्य सरकार खर्च करणार आहे. 494 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. यासाठी अद्याप राखीव निधी ठेवण्यात आलेला नसून रेल्वेकडून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधीची तरतूद केली जाणार आहे.
जमीन संपादनासाठी प्रस्ताव सादर
बेळगाव-धारवाड या 73 किमी रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अंदाजपत्रक व फिल्ड सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धारवाडच्या जिल्हाधिकाऱयांकडे जमीन संपादनासाठी प्रस्ताव सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
-अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)