रस्ते, गटारींसह पाणी समस्या सोडविण्याची व्यापाऱयांची मागणी : सोयी-सुविधांबाबत वारंवार तक्रारी
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे एपीएमसी येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील व्यापारी व हमाल तसेच खरेदीदार नसल्यामुळे निरव शांतता पसरली आहे. मात्र, या लॉकडाऊन काळात एपीएमसीमधील विविध समस्या सोडवाव्यात, अशी मागणी व्यापारीवर्गातून करण्यात येत आहे.
एपीएमसीतील आंधळा कारभार अनेकांना डोकेदुखीचा ठरत आहे. त्यामुळे येथील सोयी-सुविधांबाबत व्यापाऱयांतून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, एपीएमसी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मान्सूनपूर्व पावसामध्येच एपीएमसीमधील रस्त्यावरील खड्डय़ांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यांची अवस्था पाहता ग्रामीण भागातील शिवारांमधील रस्ते बरे रे बाबा म्हणण्याची वेळ यापूर्वी होती. मात्र, आता काही प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही उर्वरित रस्ते करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर
एपीएमसीमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. एपीएमसी प्रशासनाकडून रस्त्यांसाठी कोटय़वधीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर येथील अनेक रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. रस्त्याच्या कामांना काही प्रमाणात चालना देण्यात आली आहे. मात्र, योग्य वेळेवर हे रस्ते झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. एपीएमसीमधील अनेक रस्ते अर्धवट किंवा त्यावर डांबर नसल्याने प्रवास करणे कठीण बनले आहे. विशेष करून भाजीमार्केटकडे जाणाऱया रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून ते रस्ते करावेत, अशी मागणी होत आहे. एपीएमसीमध्ये मागील काही महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बऱयाच दिवसांनी पाणी सोडण्यात येत असल्याने व्यापारी, हमाल आणि किरकोळ विपेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता गांभीर्याने विचार करण्याची गरज असून एपीएमसीतील सर्व रस्ते व इतर सोयी लॉकडाऊन काळात कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.