ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना 3 महिन्यांचे अर्धे वेतन देण्यात येणार आहे. 24 मार्च नंतर ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) च्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. ESIC चे बोर्ड सदस्य अमरजीत कौर याविषयी बोलताना म्हणाले, ESIC अंतर्गत विमा संरक्षण असलेल्या व्यक्तीला त्याच्या तीन महिन्यांच्या वेतनाची 50 टक्के रक्कम रोख स्वरुपात दिली जाईल. त्यासाठी कामगाराची नोंदणी आणि त्याची नोकरी गेल्याची नोंदणी ESIC कडे असणे आवश्यक आहे.
नोकरी गमावलेल्या कामगारांना कोणत्याही शाखेतून यासाठी अर्ज करता येईल. त्यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात ही रक्कम दिली जाणार आहे, असेही कौर यांनी सांगितले.