सांगलीत १५ गुन्हे
ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४५७ गुन्हे दाखल झाले असून, २५० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४५७ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद ०४ जून २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९० गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok व्हिडीओ शेअर प्रकरणी २३, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
सांगलीत १५ गुन्हे सांगली जिल्ह्यात तासगाव पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १५ वर गेली आहे. संबंधित गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात अंतरजिल्हा प्रवासासाठी जे e -pass महाराष्ट्र शासनाचे संबंधीत अधिकारी जारी करतात ,ते स्वतःच्या मालकीच्या सायबर कॅफेमध्ये सुद्धा मिळतील, अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सॲपद्वारे सर्व व्हाट्सॲप ग्रुप्सवर टाकली. ज्यामुळे परिसरातील लोकांमध्ये e -pass मिळण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता.