बेंगळूर : राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्यभरात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रश्नच नाही. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असे आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमाभागातील जिल्हय़ांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर अनेक जिल्हय़ांमध्ये नाईट कर्फ्यु जारी केला आहे. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रश्नच नाही. तसेच आपल्याकडे तशी परिस्थितीही नाही. तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेनंतर पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.