बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड -१९ चा प्रसार कमी करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यात लागू केलेल्या पूर्ण लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेल्यांना १० हजार रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे, असा पुनरुच्चार कर्नाटकमधील विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.
कर्नाटक कॉंग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी शेजारी असलेल्या तामिळनाडू राज्य सरकारने गरिबांच्या खात्यात प्रत्येकी ४ हजार रुपये जमा करण्याच्या निर्णयाचा हवाला देत कर्नाटकातहीअसे पाऊल उचलावे असे ते म्हणाले.
“कोरोनामुळे शेतकर्यांना होणारा त्रास समजून घेण्यासाठी” त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी संबंधित मंत्र्यांना केले. सध्या कोरोनामुळे आलेल्या अडचणीमुळे राज्यभरातील अनेक चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर धान्य फेकण्यास सुरवात केली आहे. सरकारने त्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांना मदत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.”