प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. लॉकडाऊन खुले झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 1 लाख प्रवाशांनी विमानतळावरून प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये बेळगावची गणना होवू लागली आहे. तसेच वाढत्या प्रवाशांमुळे विकासाला चालना मिळून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे.
22 मार्चपासून कोरोना महामारीमुळे देशांतर्गत विमानप्रवास बंद करण्यात आला होता. बेळगाव हे एक सुरक्षित विमानतळ असल्याने 25 मे पासून विमानसेवा पूर्ववत करण्यात आली. प्रारंभी विमानप्रवासाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी काही मोजक्मयाच विमानफेऱया होत होत्या. परंतु जून महिन्यापासून प्रवाशांची संख्या वाढत गेली. याचबरोबर देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा पूर्ववत होत गेल्याने प्रवाशांची पहिली पसंती बेळगावला देण्यात येत होती.
मे 25 ते नाव्हेंबर 4 या सहा महिन्यांच्या कालावधवीत तब्बल 1 लाख प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. मे महिन्यात केवळ 438 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यांनतर हळूहळू प्रवास करणाऱयांच्या संख्येत वाढ होत गेली. बेंगळूर -4, हैद्राबाद – 3, मुंबई -2 तर पुणे, तिरूपती, कडाप्पा, म्हैसूर, अहमदाबाद हा शहरांना प्रत्येक एक विमान सेवा देते.
उडान योजनेत ‘बेळगाव देशात अव्वल’ , राजेशकुमार मौर्य (संचालक – बेळगाव विमानतळ)
उडान योजनेतंर्गत येणाऱया देशातील पहिल्या 50 विमानतळांपैकी प्रवासी संख्येत बेळगाव देशात पहिल्या क्रमांकावर आहे. लॉकडाऊन खुले झाल्यापासून मागील 165 दिवसांमध्ये 1 लाख प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. येथे देण्यात येणाऱया सुविधा, प्रवाशांची सुरक्षितता, परवडतील असे तिकीटांचे दर व कर्मचाऱयांच्या सेवेमुळे हे शक्मय झाल्याचे मौर्य यांनी सांगितले.