प्रतिनिधी / रत्नागिरी
गेले दीड महिना लॉकडाऊन मुळे कामधंदा नाही, खाण्या – पिण्याचे हाल, कुटुंब गावी या द्विधा मनस्थितीत नागरिक आणि मजूर अडकलेले होते, मात्र रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया करून या मजूर, नागरिकांना त्यांच्या गावी एसटी ने पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि आज रत्नागिरी बसस्थानकातुन सिंधुदुर्ग आणि अलिबाग ला दोन बसेस रवाना करण्यात आले, 40 प्रवाशी अगदी समाधानाने आपल्या गावी परतानाचे दृश्य बसस्थानाकात पहावयास मिळाले.
आज 2 वाजता या दोन्ही बसेस रवाना झाल्या, यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच सोशल डिस्टस्टींग चे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगितले. आपण आपल्या गावी जातोय यासाठी प्रशासनाचे आभार नागरिकांनी मानले.