व्यापारी, किरकोळ विक्रेते, मजूर मेटाकुटीला, रोजगार नसल्याने वाढलीये उपासमार
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन संपायला एक दिवस शिल्लक असला तरी हे लॉकडाऊन शिथिल होणार की वाढणार याकडे सगळयांचे लक्ष वेधले आहे. जिह्यात रूग्ण संख्या वाढत असली तरी शिथिलता मिळावी अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. व्यापारी वर्गासह, किरकोळ विक्रेते, मजूर यांची रोजगाराअभावी बिकट अवस्था बनली आहे.
कोरोना संसर्गापेक्षा रोजगाराची चिंता सर्वांनाच लागून आहे. दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. उद्योग धंदे, व्यवसाय बंद असल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामुळे सगळेच आर्थिक संकटात सापडले असून कर्जाचा वाढता भार कमी होत नाही. यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे. कोरोना असला तरी लॉकडाऊन शिथिल करा अशी मागणी होत आहे. येत्या 1 जूनला लॉकडाऊन वाढणार का ? यांची चर्चा सर्वत्र होत आहे. वाढती रूग्ण संख्या पाहून प्रशासन लॉकडाऊन वाढविण्यावर ठाम आहे. मात्र गरीब-गरजु ची उपासमार वाढलेली आहे. सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत लवकर पोहचत नाही. याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सकाळची वेळ 9 ते 1 अशी करावी
लॉकडाऊनला अशंत शिथिल व्हावे. जीवनावश्यक वस्तू सोबत कपडय़ाची दुकाने सुरू व्हावीत. रोज सुरू न करता एक दिवसाआड सुरू करावीत. व्यापाऱयांवर कडक निर्बंध घालण्यात यावे. जे नियम मोडत असतील त्यांच्यावर कारवाईही करण्यात यावी. मात्र दुकाने बंद ठेवण्यात येऊ नये. सकाळी 7 ते 11 ही वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यत करण्यात यावी. कारण सकाळी ग्राहक 9 नंतर खरेदीला बाहेर पडतात. दोन तासांत खरेदी होत नाही. बाधितांचा आकडा वाढत आहे. त्याबरोबर उपासमार ही वाढलेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
अशोक बादापुरे, अध्यक्ष व्यापारी संघटना
लॉकडाऊन व आर्थिक नियोजन गरजेचे
लॉकडाऊन वाढला तर लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळणार आहे. याच पाठोपाठ गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढणार आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन गरजेचे आहे. यासोबत आर्थिक नियोजनबद्दलही विचार करणे गरजेचे आहे. टप्प्या टप्प्याने या लॉकडाऊनला शिथिलता दिली पाहिजे. लॉडाऊन आणि आर्थिक नियोजन या दोन्ही बाजू समोर ठेवून निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
सागर भोसले, अनंत टेडिंग
प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे
कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही आटोक्यात यावी म्हणून प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे. प्रशासनाने किमान 15 दिवस आधी कडक ठोस पावले टाकायला पाहिजे होती. उशीर झाल्यामुळे सातारा जिह्यातील कोरोना बाधितांची आणि मृत्यूची संख्या वाढलेली आहे. पूर्णपणे प्रशासन याला जबाबदार आहे.
आशिष महाडवाले, महाडवाले बद्रर्स
यामुळे व्यापारी वर्ग आणि व्यवसायिक, सर्वसामान्यांचे जे हाल सुरू आहेत. ते हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने आता लॉकडाऊन हा एकच पर्याय समोर न ठेवता परिस्थिती बघून निर्णय घेतला पाहिजे. मात्र असे न होता प्रशासनाचा ढिसाळ कारभार वाढलेला आहे.