मास्क न वापरणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई
वाळपई / प्रतिनिधी
सरकारने कोरोना रोगाची तीव्रता बऱयाच प्रमाणात कमी झाल्यामुळे गोव्यामध्ये दुकाने सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सत्तरी तालुक्मयातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे .जवळपास 90ज्ञ् दुकाने सुरू झाली असून यामुळे आज आठवडी बाजारा निमित्त बाजारांमध्ये बऱयाच प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र पहावयास मिळाले .हॉटेल्स थेटर व्यतिरिक्त इतर स्वरूपाचे दुकाने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सरकारने घराबाहेर पडणाऱया प्रत्येकासाठी मास्क अनिवार्य केल्यामुळे आज वाळपई शहरांमध्ये यासंदर्भाची कारवाई होऊन मास्क वापरण्यावर मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्याचे सत्र पहावयास मिळाले. यामुळे बऱयाच जणांना चांगल्या प्रकारचा भुदर्ड पडल्याचे समजते .
याबाबतची माहिती अशी की या रोगाची तीव्रता गोव्यामध्ये बऱयाच प्रमाणात कमी झालेली आहे यामुळे गोवा सरकारने अनेक स्तरावरील निर्देश शिथिल केल्यामुळे कालपासून राज्यातील अनेक स्वरूपाचे दुकाने सुरू झालेली आहे. वाळपई शहरातील आज जवळपास 90 टक्के दुकाने सुरू करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे बाजारात बऱयाच प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. मंगळवार हा वाळपई शहराचा आठवडी बाजार असल्यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले .मात्र सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयातील अधिकाऱयांकडून मास्क न वापरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्यामुळे याचा बऱयाच प्रमाणात भुदर्ड नागरिकांना सहन करावा लागला .वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही कारवाई करण्यात येत होती. यामुळे मास्क न वापरणाऱया नागरिकांना दंड भरावा लागला .एकूण या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात जवळपास 100 पेक्षा जास्त जणांना दंड ठोठावण्यात आल्याचे माहिती उपलब्ध झाली. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून वाळपई शहरात पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्यामुळे व नागरिकांची वर्दळ बऱयाच प्रमाणात कमी असल्यामुळे शहराने मोकळा श्वास घेतला होता. मात्र गोवा सरकारने या रोगाची तीव्रता कमी झाल्यामुळे दुकाने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्याचा अनुकूल परिणाम वाळपई शहरावर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले .हॉटेल्स थेटर वगळता इतर स्वरूपाचे दुकाने मोठय़ा प्रमाणात सुरू होती. दरम्यान सोमवारी केरी सत्तरी याठिकाणी कर्नाटक भागातील दोन नागरिक आडवाटेने गोव्यात आल्यानंतर भागातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली असून पोलिस यंत्रणेला याबाबतीत कडक स्वरूपाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यामुळे आज दिवसभर पोलिस यंत्रणेने बेळगाव भागातून गोव्याकडे येणाऱया प्रमुख मार्ग व्यतिरिक्त इतर चोरटय़ा मार्गाच्या ठिकाणेही बंदोबस्त ठेवण्यावर भर दिला होता .यामुळे नागरिकांनी काहीप्रमाणात समाधान व्यक्त केले. मात्र जोपर्यंत कर्नाटक भागातील कोरोना रोगाच्या रुग्ण संख्येत कमी होत नाही तोपर्यंत गोव्यामध्ये पोलिस यंत्रणेने गंभीर लक्ष देऊन कर्नाटक भागातील नागरिक गोव्यामध्ये सहजासहजी प्रवेश करणार नाही याची विशेष दखल घेण्याची मागणी विभागाचे नागरिकांनी केली आहे.