रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
संपूर्ण देशात कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे लॉक डाउन चालू झाले. अन् यामध्ये कर्नाटक राज्यातील अथणी चीकोडी तालुक्यातील 70 जैन धर्मीय बांधव झारखंड राज्यातील पारसनाथ ( सम्मेद शिखर) येथे अडकले आहेत. एक महिन्याहून अधिक काळ झाला हे यात्रेकरू येथे सुरक्षित आहेत. यांना स्थानिक नागरिक संस्था यांचे चांगले सहकार्य आहे. यामध्ये 40 पुरुष 27 महिला 2 मुले यांचा समावेश आहे. आता या सर्वांनाच गावी परतण्याची ओढ लागली आहे.
कर्नाटक राज्यातील उगारखुर्द( तालुका अथणी) येथील शरद पंडित यांनी लोकप्रिय यात्रा ट्रॅव्हल्स तर्फे एकूण 53 लोकांनी प्रवासास सुरुवात केली. महाराष्ट्रातील कुंतुगिरी, कचनेर, जिंतूर, कारंजा, मुक्तागिरी, रामटेक मध्यप्रदेशातील जबल्पुर, भेंडा घाट उत्तर प्रदेशातील अलाहाबाद असा प्रवास करीत झारखंडमधील पारसनाथ (सम्मेद शिखर) येथे 18 मार्च रोजी पोहोचले 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यू व लॉक डाउन चालू झाले. त्यामुळे सर्व भाविक एक महिन्यापासून येथे थांबून आहेत.
19 मार्च रोजी कर्नाटक राज्यातील चिकोडी तालुक्यातील एकूण 18 भाविक आहेत. त्यामध्ये 13 पुरुष 3 महिला व 2 मुलांचा समावेश आहे. हे यात्रेकरू ही या ठिकाणी थांबले आहेत. कर्नाटकातील अथणी आणि चिकोडी या तालुक्यातील सर्व भाविक झारखंड येथील मधुबन गावात वीस पंती कुटी या धर्मशाळेत पायथ्याला थांबले आहेत. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, प्रांताधिकारी, तहसीलदार आदि शासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंची चौकशी केली आहे. सर्वांचे सहकार्य आहे. सर्व यात्रेकरूंची तब्येत अत्यंत उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे पण यात्रेकरू कंटाळले असून सर्वांनाच घरची ओढ लागली आहे. 20 एप्रिल नंतर लॉक डाऊन मध्ये सूट मिळाली तर गावाकडे जाण्याचा मिळणार की 3 मे नंतर याच विवंचनेत सर्वजण आहेत. तर रेल्वेने गेलेल्या भाविकांना रेल्वे चालू झाल्यानंतरच आपल्या गावाकडे परत जाता येणार आहे.