खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा येथे अखिल कर्नाटक वाल्मिकी महासभा शाखा तसेच वाल्मिकी समाज बांधवांच्यावतीने वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाल्मिकी फोटोचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वाल्मिकी समाजातील आश्विनी बाळाप्पा सत्यनायक, रक्षीता रामाप्पा बिच्चगत्ती या दोन विद्यार्थिनी एसएसएलसी परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्ा़खाrफळ, मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुका समाज कल्याण अधिकारी हणमंत वकूंद, करविर दोडवाड, परशुराम हाळभावी, अरुण बळळारी, नजीरअहमद मुल्ला, शांता खंडुरे, सन्नव नायक, रफिक कित्तूर, यल्लाप्पा नायक, निंगव्वा सत्यनायक, प्रकाश बिच्चगत्ती, बाळाप्पा सत्यनायक तसेच वाल्मिकी समाजबांधव व गावकरी उपस्थित होते.
Previous Articleतुरमुरी-कोनेवाडी रस्त्यावरील श्रमदानातून बुजविले खड्डे
Next Article बेळगुंदी येथे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.