प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तदारांचे वाटप करण्यात आले. फौंडेशनने दत्तक घेतलेल्या गावांपैकी कणकुंबी हे खानापूर तालुक्मयातील दुर्गम असे गाव आहे. येथील मुले शाळेत जाण्यासाठी दररोज 8 ते 10 कि.मी. पायपीट करतात. या मुलांचे पालक रोजंदारीसाठी शेतात काम करतात. किंवा खानापूर, बेळगाव आणि गोवा येथे काम करतात. लोककल्पने इफको टोकिओच्या सहकार्याने कणकुंबीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तर वितरीत केले. यामुळे मुले आनंदली तर मुख्याध्यापकांनी लोककल्पला धन्यवाद दिले.