दिल्ली : प्रतिनिधी
भाजप खासदार वरुण गांधी यांनी मंगळवारी नरेंद्र मोदींच्या राजवटीत बँका आणि रेल्वेचे खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नांवर तोफा डागल्या. ज्यामुळे हजारो नोकर्या बुडतील, असे सांगून लोककल्याणाचे सरकार असमानता निर्माण करून कधीही भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही असेही ते म्हणाले.
पीलीभीतचे खासदार असलेले वरूण गांधी “सुपर करप्ट सिस्टम” विरुद्ध “ठोस कारवाई” न केल्याबद्दल “सरकार” वर जोरदार टीका केली. “बँका आणि रेल्वेच्या खाजगीकरणामुळे पाच लाख कर्मचारी सक्तीने सेवानिवृत्त होऊन बेरोजगार होतील. नोकऱ्या गेल्यामुळे लाखो कुटुंबांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. ‘लोककल्याणकारी सरकार सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता निर्माण करून भांडवलशाहीला कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही,” असे वरुण यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.