प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य ग्रंथालयातर्फे इंदिरा संत स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आज ‘त्या तिघी’ हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
जाज्वल्य देशभक्तीने भारलेले स्वातंत्र्य सैनिक देशासाठी लढत होते, कारावास भोगत होते, तेंव्हा त्यांच्या पत्नी कुटुंबाचा डोलारा सांभाळत होत्या. अशा अनेक महिलांनी पतीला कौटुंबीक जबाबदाऱयांतून मुक्त ठेवले. म्हणून ते राष्ट्र उभारणीचे कार्य करू शकले. त्यातही सावरकर बंधुंचे स्वातंत्र्य लढय़ातील योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नींनी काय सोसले असेल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
नेमक्मया याच विषयावर डॉ. शुभा साठे यांनी कादंबरी लिहिली. या कादंबरीवर आधारित हा प्रयोग आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन अपर्णा चौथे यांचे असून त्याच हा प्रयोग सादर करतात.
सावरकर बंधुशिवाय त्या तिघी कशा जगल्या याचे चित्रण या प्रयोगात आहे. पतीविरह कष्ट, जबाबदारी, प्रसंगी उपासमार सहन करतही त्यांनी पतीच्या राष्ट्र कार्याला नेहमीच पाठिंबा दिला. अशा बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदाबाई, बॅ. विनायक यांच्या पत्नी यमुनाबाई आणि नारायण यांच्या पत्नी शांताबाई सावरकर या तिघींचा जीवनपट हा प्रयोग उलगडतो. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
अपर्णा चौथे यांचा परिचय पुढील प्रमाणे….
अपर्णा चौथे यांनी मास्टर ऑफ फार्मसी ही पदवी घेतली आहे. अभिनय, सूत्रसंचालन, गायन हे छंद त्यांना आहेत. त्या शास्त्राrय नृत्यातही पारंगत आहेत. सध्या प्रशांत दामले यांच्या संस्थेत कार्यरत आहेत. बायकात पुरुष लांबोडा, संगीत सौभद्र, चार दिवस प्रेमाचे, गेला माधव कुणीकडे, येग, येगं सरी, जादू तेरी नजर अशा एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सध्या तो मी नव्हेच आणि रायगडला जेंव्हा जाग येते या नाटकात त्या काम करत आहेत.