प्रतिनिधी / बेळगाव
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनानिमित्त लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे गुरुवार दि. 4 रोजी मराठा शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वा. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ थिएटर) येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकमान्य परिवाराचे संस्थापक व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर भूषविणार आहेत.
यानिमित्त प्रा. अनिल चौधरी हे ‘औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत. सतराव्या शतकाला व्यापून राहणारी आणि पुढील अनेक शतके आपली छाप उमटविलेली अशी ही दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आहेत. दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू होते. परंतु तरीही एकमेकांच्या मोठेपणाबद्दल आदरही होता. याबाबत विस्तृत विश्लेषण प्रा. अनिल चौधरी आपल्या व्याख्यानातून करणार आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे यावषी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱयांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी केलेला त्याग आताच्या पिढीला समजावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. दरवषी शौर्य दिनानिमित्त भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावषीही शिवप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला असून याचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले आहे.