बेळगाव /प्रतिनिधी
देशात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे ही लोकसंख्या नियंत्रणात आणणे गरजेचे बनले आहे. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने लोकसंख्या नियंत्रणाबाबत माहिती आणि जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
देशासह शहरात ठिकठिकाणी याबाबत जागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दि. 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात शहर परिसरातील विविध भागात, रस्त्यांवर पथनाटय़, दृकश्राव्य अशा विविध मार्गाने जागृती उपक्रम राबविला जाणार आहे. समस्त नागरिकांनी याबाबत रितसर माहिती करून घ्यावी. केंद्र सरकारच्यावतीने लोकसंख्या नियंत्रण करण्याबाबत सुरू केलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.