ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस हेरगिरी, कृषी कायदे आणि महागाई या विषयांवर विरोधक आवाज उठवत आहेत. मात्र, आतापर्यंत झालेल्या सत्रात केंद्र सरकारकडून कोणत्याही मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली नाही. केंद्र सरकारने विरोधी पक्षांनाच चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसदेचे हे अधिवेशन नियोजित वेळेच्या दोन दिवस आगोदर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले. पहिल्या दिवसापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी, वाढती महागाई, कृषी कायदा या मुद्यांवरुन सभागृहात गदारोळ घातला. मात्र, केंद्र सरकारकडून आजपर्यंत या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे 13 ऑगस्टपर्यंत चालणारे हे अधिवेशन दोन दिवस आधीच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.