ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस आहे. पेगासस हेरगिरीच्या वादावरून दोन दिवस विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ घातला. त्यानंतर आज म्हणजेच गुरुवारी सकाळी 11 कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला.
त्यामुळे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
तर लोकसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आता लोकसभेचे कामकाज देखील 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे
तर काँग्रेसच्या खासदारांनी शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संसदेच्या परिसरात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पार पडत आहे.