खरगपूर आयआयटी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा संदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तंत्रज्ञांनी जनतेच्या उपयोगी पडतील आणि देशाची आर्थिक प्रगती करतील अशा प्रकारच्या स्टार्टअप कंपन्या स्थापन कराव्यात आणि देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते पश्चिम बंगालमधील खरगपूर येथील आयआयटी विद्यार्थ्यांच्या पदवीदान कार्यक्रमात व्हिडीओ कॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करीत होते.
आयआयटीचे विद्यार्थी हे भारताच्या आत्मनिर्भरतेचा आत्मा आहेत. तंत्रज्ञान शाखांच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली दृष्टी वर्तमानावर ठेवावी आणि ध्येय भविष्यकाळाचे बाळगावे. तंत्रज्ञान क्षेत्रात नवी दृष्टी आणि नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावरच देश आर्थिक प्रगती करू शकतो. त्यामुळे देशात झपाटय़ाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होण्याची नितांत आवश्यकता आहे. तांत्रिक आत्मनिर्भरतेतच भारताचे सामर्थ्य दडलेले आहे. विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्टार्टअप्सना प्राधान्य देणार
तंत्रज्ञान विषयक स्टार्टअप्सना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे. आपल्याला विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून रहावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हाच आपल्या सर्व समस्यांवर उपाय आहे.
2,800 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या कार्यक्रमात आयआयटी खरगपूरच्या 2 हजार 800 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सर्व कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाला. 75 पदक विजेत्या विद्यार्थ्यांन प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. मात्र, यंदा विशिष्ट परिस्थितीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले गेले.
विद्यार्थीचे देशाचे भवितव्य…
ड तंत्रज्ञानाचा विकास करणारे विद्यार्थीच घडविणार देशाचे भवितव्य
ड आर्थिक प्रगती आणि आत्मनिर्भरता तंत्रज्ञान विकासावर आधारित