ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉक डाऊन मुळे गरीबांसमोरील समस्या वाढत आहेत. या अशा परिस्थितीत लोकांना अर्थिक मदत म्हणजेच लोकांच्या हातात रोख रक्कम द्या तसेच कर्जही माफ करा असा सल्ला नोबेल पारितोषिक विजेते तसेच अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी दिला.
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. देशातील संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होतं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी आज चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी अभिजीत यांना विचारले की जेव्हा तुम्हाला नोबेल पारितोषिक जाहीर झाले तेव्हा कसे वाटले? हा पुरस्कार मिळेल असे वाटले होते का ? यावर उत्तर देताना अभिजीत यांनी सांगितले की, मी असा विचार कधीच केला नव्हता.
ते पुढे म्हणाले की यु.पी सरकारने चांगली धोरणे राबविली होती पण आता तसे होताना दिसत नाही. हे सरकार ती धोरणे राबवत नाही. आधार सारखी योजना यु पी सरकारने राबवली त्या योजनेला या सरकारनेही योग्य असल्याचे सांगितले. या योजना कोरोनाच्या काळातही उपयोगी पडू शकतात. मात्र देशात त्याची अजूनही अंमलबजावणी केली गेली नाही आहे.
पुढे राहुल गांधी म्हणाले, येणाऱ्या काळात बँकेसमोर अनेक आव्हाने असतील, नोकऱ्या वाचवणे कठीण होईल. यावर अभिजीत म्हणाले, हे अगदी खरे होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देशात आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. जपान, अमेरिकेसारख्या देशांनी आर्थिक पॅकेज दिले आहे परंतु आपण तसे केले नाही त्यामुळे छोट्या उद्योगांना मदत करण्याची गरज आहे. तसेच या तिमाहीत कर्जदेयके माफ करण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणाले, लॅक डाऊन मधून जेवढं लवकर बाहेर पडता येईल तेवढं चांगलं आहे मात्र त्यानंतर आपल्याकडे एखादा प्लॅन असण्याची गरज आहे. नाहीतर आपला सारा पैसा वाया जाईल. याबाबत बोलताना अभिजीत म्हणाले की, आपल्याला महामारी बद्दल माहिती असणे गरजेचे आहे लॉक डाऊन वाढवून काही साध्य होणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.