ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजचा सरकारने पुन्हा एकदा विचार केला करून लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाका कारण या स्थितीला त्यांना कर्जाची नाही तर आर्थिक मदतीची गरज आहे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, मागणी आणि पुरवठ्याचे गणित सुधारण्यासाठी पैसे देण्याची गरज आहे. तसेच सरकारला सावधानगिरीने लॉक डाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, शेतकरी, मजुरांनी आपला देश उभा केला आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यांना कर्जाची नाही तर थेट पैसे देण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा पॅकेजचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.
आता भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका, ते नंतर ही सुधारता येईल. त्यामुळे शेतकरी, मजूर यांची काळजी करण्याची गरज आहे असे म्हणत त्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत असे ही त्यांनी यावेळी म्हटले.