आमदार जाधवांच्या इशाऱयानंतर महामार्ग अधिकारी नरमले
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात लोटे (पटवर्धन-लोटे) येथे भुयारीमार्ग मंजूर असताना प्रत्यक्षात तो न ठेवताच काम सुरू होते. अखेर आमदार भास्कर जाधव यांनी महामार्ग अधिकाऱयांना यासंदर्भात सुनावल्यानंतर भुयारीमार्ग करूनच महामार्गाचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले.
स्थानिक शिवसेना पदाधिकाऱयांनी वारंवार स्थानिक अधिकारी आणि ठेकेदार यांना सांगूनही भुयारीमार्ग न ठेवताच मातीचा भराव आणि त्यावर काँक्रिटचा पहिला थर टाकला. ही बाब शिवसेनेचे पदाधिकारी अंकुश काते व त्यांच्या सहकाऱयांनी मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी लोटे येथे आलेल्या आमदार जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना दूरध्वनी केला व मातीचा भराव आणि काँक्रिटचा पहिला थर झाल्यानंतर अंडरपास कसा करणार, असा प्रश्न केला. मोठी बाजारपेठ असलेल्या या ठिकाणी मंजूर असलेला भुयारीमार्ग न करता काम केले जाणार असेल तर हे काम कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा दिला. त्यावर अधिकाऱयांनी लोटे येथे भुयारीमार्ग करूनच रस्त्याचे काम करण्यात येईल, असे त्यांना सांगितले.