उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
वंटे-फातर्पा येथील सरकारी शाळा इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते झाले. ही इमारत गावच्या लोकांना चांगल्या कार्यक्रमांसाठी उपयोगात आणता येणार आहे. नूतनीकरणाचा संपूर्ण खर्च खणगिणी-बेतूल येथील ओएनजीसीने केला असून 6 लाख रु. त्यांनी उपलब्ध करून दिले.
वंटे या वाडय़ावरील या शाळेत मुले येत नसल्याने ही शाळा मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. इमारतीचा वापर झाला नसल्याने ती मोडकळीस आली होती. गावच्या तरुणांनी मंत्री कवळेकर यांची भेट घेऊन दुरुस्ती करण्याची व इमारत वाडय़ावरील कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यावेळी कवळेकर यांनी तरुणांना ताबडतोब प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. कवळेकर यांनी गावची मागणी पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला व इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी गावचे बुजुर्ग काशिनाथ व मोहिनी फळदेसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुलीच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देण्यात आली.
या उद्घाटनप्रसंगी बाळळीच्या सरपंच दिपाली फळदेसाई, फातर्पा सरपंच मंदा नाईक देसाई, उपसरपंच बाप्तिस्त फर्नांडिस, पंच शीतल नाईक, मेदिनी नाईक, मंदा फळदेसाई तसेच बेतूल येथील ओएनजीसीचे कार्यकारी संचालक अतुल गर्ग, सरव्यवस्थापक (सीएसआर) संजय कुमार, सरव्यवस्थापक (एचआर) दयानंद कालकुंडिया, ‘सीएसआर’चे सदस्य सागर देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री कवळेकर यांनी स्वतःच्या कामांसाठी कुणीही आपल्याकडे येतात, मात्र वंटेचे तरुण गावचे सार्वजनिक काम घेऊन आल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या इमारतीमुळे गावात तरुणांना उत्तम सोय झाली आहे. आता सांस्कृतिक उपक्रम व अन्य चांगल्या कामांसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच गावच्या स्वयंसाहाय्य गटांनीही योग्य कामांसाठी या जागेचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपात प्रवेश हे योग्य पाऊल
चार वेळा आपणास लोकांनी निवडून दिले, मात्र विरोधी पक्षात असल्याने मतदारसंघाला विशेष न्याय देता आला नाही. लोकांची काळजी होती व मतदारसंघात विकासकामे करणे बाकी होते. या सर्व गोष्टी जाणूनच सत्ताधारी भाजपा पक्षात प्रवेश केला. आपण योग्य पाऊल उचलले. त्यास आपले कार्यकर्ते वा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला नाही, तर जोरदार स्वागत केले. यामुळे योग्य कामे करण्याची संधी लाभली. अनेक कामे सध्या चालू आहेत, असे कवळेकर म्हणाले.
भूमिगत वीजवाहिन्यांचे काम दोन टप्प्यांत
वंटे वाडय़ावरील आपले निष्ठावंत कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. येथील तरुणांनी स्वतःपेक्षा गावच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले आहे. शाळा इमारत हे त्याचे एक उदाहरण समोर आहे. नुकतीच फातर्पा पंचायत परिसरातील रस्त्यावर वाढलेली झुडपे 2 लाख खर्चून आपण कापून घेतली आहेत. ते रहदारीला सोयीस्कर ठरले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन टप्प्यांत पश्चिम केपेतील पंचायत परिसरांत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू होणार आहे, असे कवळेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत योग्य प्रशासन देत आहेत असे सांगून त्यांच्या कार्याची कवळेकर यांनी प्रशंसा केली.
ओएनजीसीच्या गर्ग यांनी उपमुख्यमंत्री कार्यक्षम असून त्यांच्या कृतीतून ते पाहायला मिळते असे सांगून त्यांची प्रशंसा केली. नागरिकांनी चांगल्या कामांकरिता आपला वेळ द्यावा व प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले केले. बाळळी येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानचे अध्यक्ष नीलेश फळदेसाई यांनी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या कार्याची स्तुती केली व देवालयाच्या विकासकामांकडे त्यांचे लक्ष वेधले. सरपंच दिपाली फळदेसाई व मंदा नाईक देसाई यांचीही भाषणे झाली. वंटे वाडय़ावरील नागरिकांनी इमारतीचा चांगला उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार कोप्रे देसाई यांनी केले, तर आभार नीलेश फळदेसाई यांनी