प्रतिनिधी/ सातारा
गेल्या आठवडय़ात जोराचा पाऊस झाला होता.त्या पावसात साडे तीनशे वर्षा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या वंदनगडाच्या दक्षिण दरवाजाच्या बाजूची तटबंदी ढासळली होती.श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी रविवार मोहीम नियोजन करून भर पावसात शिव कार्य केले.मोजक्याच मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत काम केले.
वंदनगडावर दक्षिण दरवाजाच्या बाजूला असलेली तटबंदी पावसामुळे तटबंदी ढासळली होती.एक महिन्या पूर्वी याठिकाणी श्रमदान करण्यात आले होते. पडझड झाल्यामुळे पुन्हा काम वाढले होते.भर पावसात शिववंदनेश्वरचे मालगाव, राऊतवाडी व परिसरातील मावळे श्रमदान करत होते. साहिल कदम, अनुज कणसे, ऋषिकेश फडतरे, अथर्व कदम, स्वप्निल डिगे
मयूर कदम, ऋत्विक कदम, केतन डिगे, अभि सुर्वे, राहुल कदम, ओंकार कदम, प्रशांत कदम, सुजित कदम, डॉ. सुनिल निकम, कुणाल गायकवाड यांनी यात सहभाग घेतला होता.रस्ता अरूंद होता. काम करताना अडचणी होत्या. त्यावर मात करून कार्य केले जात आहे.मावळ्यांनी उत्साहाने काम केले.